कॉलेज शाळानवीन वर्ष 2026नाशिकबारावी परीक्षामराठवाडामहाराष्ट्रविदर्भशाळे कॉलेजसामाजिक कार्यकर्ते

जनता विद्यालय, पाटोदा केंद्रात इयत्ता १२ वीच्या परीक्षेला सी.सी.टी.व्ही. निगराणीत सुरुवात

दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय, पाटोदा (केंद्र क्रमांक ०२१५) येथे इयत्ता १२ वीच्या

जनता विद्यालय, पाटोदा केंद्रात इयत्ता १२ वीच्या परीक्षेला सी.सी.टी.व्ही. निगराणीत सुरुवात

      नाशिक | येवला | प्रतिनिधी : प्रविण पाटील

दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय, पाटोदा (केंद्र क्रमांक ०२१५) येथे इयत्ता १२ वीच्या परीक्षेला अधिक शिस्तबद्ध व कडक नियोजनात सुरुवात झाली आहे. या केंद्रावर विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतील एकूण ५७३ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देत असून, शासनाच्या नव्या निर्देशांनुसार यंदा परीक्षा सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांच्या कडक निगराणीत पार पडत आहे.

परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्रांगणात एकत्र जमविण्यात आले. त्यानंतर कॉपी तपासणी (चेकिंग) करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य, चिठ्ठ्या अथवा अन्य प्रतिबंधित साहित्य कोणीही आत नेऊ नये, यासाठी काटेकोर तपासणी करण्यात आली. शासनाने प्रथमच अशा प्रकारची व्यापक सी.सी.टी.व्ही. आधारित यंत्रणा लागू केल्याने परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध व विश्वासार्ह बनली आहे.

परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच आवश्यक त्या सूचना व नियमांची माहिती देण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर. एस. पाखले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, “ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी,” असे मार्गदर्शन केले. तर पर्यवेक्षक श्री. ढेपले सर यांनी परीक्षा नियम, वेळापत्रक व शिस्तीबाबत सविस्तर सूचना दिल्या.

परीक्षा केंद्रावर पोलीस व होमगार्ड कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले असून, बाहेरून कोणतेही साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पालकांनीही नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षकवृंद सक्रिय असून, महेश पाटील सर, देवरे सर, महाले सर, चव्हाण सर, लभडे सर, बोरनारे सर, विजय मढवई सर आदी शिक्षक उपस्थित राहून परीक्षा प्रक्रियेत योगदान देत आहेत.

थोडक्यात विश्लेषण :

यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी राबविण्यात आलेली सी.सी.टी.व्ही. निगराणी व्यवस्था ही शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाची सुधारणा मानली जात आहे. यामुळे कॉपीमुक्त परीक्षा, शिस्त आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होत असून, प्रामाणिक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही बळकट होतो. मात्र, सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये थोडा मानसिक ताण जाणवला तरी योग्य मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि सुरळीत नियोजनामुळे परीक्षा शांततेत पार पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दीर्घकालीन दृष्टीने ही व्यवस्था शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्यास उपयुक्त ठरेल, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!